38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeशैक्षणिक*आयआयबी कडून नीट परीक्षा व निकाला संदर्भात सीबीआय चौकशीची मागणी*

*आयआयबी कडून नीट परीक्षा व निकाला संदर्भात सीबीआय चौकशीची मागणी*


आयआयबी विद्यार्थी हितासाठी कायम कटीबद्ध सर्वोच्च पातळीवर करणार पाठपुरावा ..


नांदेड( प्रतिनिधी ) – नीट निकाला संदर्भातील २५ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नाकडे प्रशासकीय व राजकीय स्तरावरील वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी आयआयबीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि विरोधी पक्षनेते नानासाहेब पटोले यांना भेटून नीट निकाला संदर्भात सविस्तर निवेदन दिले असून त्यासोबतच माजी मंत्री आणि विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांना या घटनेची सविस्तर माहिती आयआयबीचे संचालक प्रा.बालाजी वाकोडे यांनी यावेळी दिली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (निट) च्या प्रशासनासंबंधी नुकत्याच झालेल्या निट परीक्षेदरम्यान नोंदवलेल्या विविध अनियमितता आणि विंसगतींमुळे विद्यार्थी आणि पालक व्यथित आहेत.
निट परीक्षा आयोजित करताना गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटणे, तांत्रिक त्रुटी आणि इतर गंभीर समस्यांचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत, असे असंख्य मीडिया रिपोर्ट्स व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रत्यक्ष लेखांद्वारे सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. या घटनांमुळे केवळ परीक्षा प्रक्रियेच्या प्रामाणिकपणावर आणि निष्पक्षतेवरच शंका निर्माण झाली नाही तर या महत्त्वपूर्ण परीक्षेची तयारी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या इच्छुकांमध्ये अनावश्यक ताण आणि चिंता निर्माण झाली आहे.


या आरोपांचे गांभीर्य आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता, एनटिए द्वारे निट परीक्षा आयोजित करण्याबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे या प्रकरणाची सर्वमसावेशक चौकशी सुरु करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सिबीआय) ला निर्देश द्यावेत अशी विनंती आयआयबीच्या वतीने निवेदनाव्दारे वरीष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे

नीट परिक्षेची विश्‍वासहर्ता टिकविणे अंत्यत गरजेची …
सीबीआयच्या तपासामुळे नोंदवलेल्या अनियमिततेमागील सत्य उघडकीस आणण्यास मदत होईल आणि घडलेल्या कोणत्याही चुकीच्या कृत्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात येईल. गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी परीक्षा प्रणालीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

आयआयबीने निवेदनात लक्ष वेधलेले मुद्दे ..
क्र.१ – विद्यार्थ्यांना वाढीव गुणांऐवजी वाढीव वेळ का दिला गेला नाही.
२ – एनटिए ने सांगितलेल्या प्रमाणे मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये वाढील गुण दिल्याचे सांगितले परंतु सुप्रीम कोर्टाच्या १३/०६/२०१८ रोजी दिलेल्या निर्णय क्र. ५५१ नुसार वाढीव गुण हे मेडिकल व इंजीनिअरिंग या परिक्षा वगळून देण्याचे सांगितले आहे.

क्र.३ – ७२० गुणावर ६७ विद्यार्थी, १५६३ विद्यार्थ्यांनाच वाढीव गुण कशामुळे, इतर अनेक सेंटर वर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागणे शक्य आहे का ?

क्र. ४ – फिजीक्स विषयामध्ये एका प्रश्नांचे दोन उत्तर दिलेले आहेत त्याऐवजी त्या प्रश्नाला बोनस गुण देण्यात यावे.
क्र. ५ परीक्षेची विश्सार्हता वाढवण्यासाठी झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थी पालकांमधील नीट परीक्षेबाद्डला चे संभ्रम दूर करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]