स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेड व
बाभळगाव येथील कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय यांच्या
संयुक्त विद्यमाने येथील प्रा. आ. य. पवारांच्या कवितेवर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी)
स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेड आणि लातूर येथील कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ५ मे रोजी प्रसिद्ध साहित्यिक प्रा.आ.य.पवार यांच्या विज्ञान आणि निसर्ग कवितावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, ५ मे रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राचे उदघाटन वाराणसी विद्यापीठाचे (उत्तर प्रदेश) मराठी विभाग प्रमुख व प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रमोद पडवळ हे करणार असून यावेळी प्रसिद्ध लेखिका व विज्ञान साहित्याच्या अभ्यासक आणि अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ.मोना चिमोटे बीजभाषण करणार आहेत. या उदघाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाविदयालयाचे प्राचार्य प्राचार्य राम वाघ भूषवणार आहेत. दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्याम देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदरील चर्चासत्र तीन सत्रात होणार असून निसर्ग कवीतावर होणाऱ्या पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तिर्थ नांदेड विद्यापीठाचे डॉ. पथ्वीराज तौर राहणार असून, विज्ञान कविता संदर्भाने दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थानी गोवा विद्यापीठाचे डॉ. चिन्मय घैसास, राहणार आहेतम. या दोन्ही सत्रात मान्यवरांचे निबंध वाचनही होणार आहे. एकंदरीत राज्यातील विविध महाविद्यालयातील नामवंत समीक्षक, अभ्यासक या आभासी चर्चा सत्रात सहभागी झाले आहेत. आ.य.पवारांच्या कविता विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमात असून त्यांच्या कवितेवर तीन समीक्षा ग्रंथ मान्यवर संपादकांनी संपादित केले आहेत. कवी पवार यांनी नव्वदोत्तरी मराठी कवितेत दुर्मिळ विज्ञान कवितेचा प्रवाह समृद्ध केला असून, शेत शिवार व बांधावरील निसर्ग रुपाची चित्रणे वेगळ्या शब्दशिल्पात रेखाटली असल्याने ही निसर्ग कविता समीक्षकांना प्रयोगशिल वळणाची व स्वतंत्र वाटते.
